बदलांना आलिंगन द्या !

 


बदल ही एकमेव गोष्ट या जगात कधीच बदलत नाही !

भविष्य बदलण्याची आशा तुम्हाला वाटत असेल तर स्वतःला  बदलल्यावाचून पर्याय नाही. मान्य आहे, बदलायला मन लगेच तयार होणार नाही, पण स्पर्धेच्या या जलद युगात आजच्या गोष्टी उद्या जुन्या व शिळ्या झालेल्या असतात. काळाबरोबर तुमचं ज्ञान तुम्ही अपडेट ठेवता का ? 

खूप लोक बदलाला घाबरतात आणि तिरस्कारसुद्धा करतात.  काही तर आमच्या काळात असं नव्हतं ,असं सांगून निसटून निघतात.


मी पुन्हा पुन्हा सांगेन , 

हो ! बदल अपरिहार्य आहे.

   तुम्हाला वर्तमानपेक्षा भविष्यकाळ उज्ज्वल करायचा असेल तर !

 

प्रत्येकजण स्वतःला मोजायचं विसरला आहे !

आपल्याला वाटतं जगात बदल घडावा, क्रांती घडावी पण आपल्याला वजा करून ! आपली शोकांतिकाच ही आहे की , शिवाजी जन्माला यावा पण माझ्या नको शेजार्‍याच्या घरात . बदलाच्या या प्रचंड वेगात आपण स्वतःला नाही बदललं तर काही दिवसांतच आपण ठिगळ लावलेल्या कपड्याप्रमाणे दिसायला लागू.


  लक्षात ठेवा ,

स्वभावात , विचारात बदल केल्यास माणूस जर लाथ देणारा गाढव होऊ शकतो , 

तर विचारांच्या बदलाने तोच माणूस लाथ मारील तिथे पाणीसुद्धा काढू शकतो !


                                                           - दिनेश आदलिंग

लाईफ अँड बिझनेस कोच 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधी हातपाय पसरा , अंथरूणाचं नंतर बघू ...!

पहिलं प्रेम...... जगण्यावर !!