पोस्ट्स

आधी हातपाय पसरा , अंथरूणाचं नंतर बघू ...!

इमेज
                                                                 एक म्हण आहे  ' अंथरूण पाहून हातपाय पसरावेत ! ' दुर्दैवाने प्रत्येकाने या म्हणीचा अर्थ सोयीने करून घेतला आहे. वर्षानुवर्षे हातपाय आखडून झोपायची - बसायची सवय लागली ! पण यामुळे मनात आणलं तर  हातपाय पसरू शकतात , हेच हात यशाच्या आकाशाला कवेत घेऊ शकतात , हे आम्ही विसरून गेलो. आपले पाय चालू-धावू शकतात, मनात आणलं तर तेच पाय जग जिंकू शकतात. याच पायाचं लाथेत रूपांतर करता येतं आणि लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची क्षमता असताना आपण आपले पाय अंथरुणाच्या मापाने पसरावेत, हीच शोकांतिका आहे . आपले पाय हलू शकतात, मनात आणलं तर ऑलिम्पिकमध्ये धावू शकतात आणि जिंकूही शकतात, पण आपल्या हे डोक्यातच येत नाही ! असं का होतं ?  कारण  - आपले पाय इतरांच्या डोक्याने चालतात , आणि आपली डोकी इतरांच्या पायावर टेकतात !   म्हणून डोकं नसण...

बदलांना आलिंगन द्या !

इमेज
  बदल ही एकमेव गोष्ट या जगात कधीच बदलत नाही ! भविष्य बदलण्याची आशा तुम्हाला वाटत असेल तर स्वतःला  बदलल्यावाचून पर्याय नाही. मान्य आहे, बदलायला मन लगेच तयार होणार नाही, पण स्पर्धेच्या या जलद युगात आजच्या गोष्टी उद्या जुन्या व शिळ्या झालेल्या असतात. काळाबरोबर तुमचं ज्ञान तुम्ही अपडेट ठेवता का ?  खूप लोक बदलाला घाबरतात आणि तिरस्कारसुद्धा करतात.  काही तर आमच्या काळात असं नव्हतं ,असं सांगून निसटून निघतात. मी पुन्हा पुन्हा सांगेन ,  हो ! बदल अपरिहार्य आहे.    तुम्हाला वर्तमानपेक्षा भविष्यकाळ उज्ज्वल करायचा असेल तर !   प्रत्येकजण स्वतःला मोजायचं विसरला आहे ! आपल्याला वाटतं जगात बदल घडावा, क्रांती घडावी पण आपल्याला वजा करून ! आपली शोकांतिकाच ही आहे की , शिवाजी जन्माला यावा पण माझ्या नको शेजार्‍याच्या घरात . बदलाच्या या प्रचंड वेगात आपण स्वतःला नाही बदललं तर काही दिवसांतच आपण ठिगळ लावलेल्या कपड्याप्रमाणे दिसायला लागू.   लक्षात ठेवा , स्वभावात , विचारात बदल केल्यास माणूस जर लाथ देणारा गाढव होऊ शकतो ,  तर विचारांच्या बदलाने तोच माणू...

पहिलं प्रेम...... जगण्यावर !!

इमेज
                      माझ्या स्वयंप्रेरणाच्या कार्यशाळेत भाग घेतलेल्या एका विद्यार्थ्याची छोटी गोष्ट. स्वयंप्रेरणाच्या पाच दिवसीय कार्यशाळेच्या तिसऱ्याच दिवशीचा विषय असतो-प्रेमाला प्रेरकशक्ती कसे बनवावे ? त्या दिवशीचं सत्र संपल्यावर एक 20 -21 वर्षाचा तरुण मुलगा धुमसतंच माझ्याकडे आला आणि म्हणाला.... "सर, प्रेमबिम सगळं झूट असतं,ज्या व्यक्तीवर आपण जीव ओवाळून टाकावा...स्वतःपेक्षाही ज्या नात्याला मी जपत होतो ती मुलगी अशी अचानक परकी व्हावी..? ती मला सोडून गेली याच दुःख नाही सर पण, तिने त्या बावळट, भंगारछाप काळ्या रोहनला जवळ करावं म्हणजे किती हा मूर्खपणा ... "  तो अस काही भडाभडा बोलत होता की , तिच्या विषयीचा सगळा राग , द्वेष , तिरस्कार डोळे पाणावून व्यक्त होत होता. मी शांतपणे विचारलं मग पुढे काय ? त्यावर त्याच उत्तर - सर खरं सांगू मला तर तिचा जीव घ्यावासा वाटतोय... नाहीत मी तरी...संपवाव वाटतंय सगळंच !            माझ्या तरुण मित्रांनो, ऐन उमेदीत तारुण्याच्या उंबरठ्यावर सगळं 'संपवावस' वाटणं...

ब्लॅक अँड व्हाईट सेवाव्रत

इमेज
हिंगसे आप्पांची आणि माझी पहिली भेट कधी झाली हे नीट आठवत नाही पण प्रत्येक भेटीत आप्पांची ओळख नव्याने होत गेली. हिंगसे आप्पा अर्थात- हरिभाऊ बाबुराव हिंगसे,वय फक्त ७८ आणि उत्साह २८च्या तरुणाईला लाजवेल असा! शिक्षण-जुनी मॅट्रिक. कायम काळसर रंगाची पॅन्ट आणि त्यावर फिक्कट पांढरा शर्ट हा आप्पांचा ठरलेला 'ब्लॅक अँड व्हाईट' पेहराव. सोबत गळ्यात दोरीत ओवलेला नोकियाचा जुना,साधा मोबाईल ! आप्पांना कधीही भेटा, सतत कसल्यातरी कामात व्यस्त.पण चेहऱ्यावर कसलाच चिडका भाव नाही की वय झाल्याच्या तक्रारी नाहीत! पाचवी-सहावीतल्या विद्यार्थ्याने ज्या निरागसतेने आणि उत्सुकतेने एखादी नवीन गोष्ट शिकावी तीच भावना कायम चेहऱ्यावर...      आप्पांना थांबणे बिलकूल पसंत नाही म्हणूनच की काय १९६४ पासून २००१ पर्यंत शासनाच्या आरोग्य विभागात ३७वर्ष 'कुष्ठतंत्रज्ञ' म्हणून रुग्णसेवा करून 30एप्रिलला सेवानिवृत्ती आणि 1मे ला लगेचच बारामतीतील डॉ. भोईटे यांच्या 'गिरीराज हॉस्पिटल मध्ये 'समन्वयक' म्हणून पुढची १८वर्षे  ते पूर्णवेळ  कार्यरत होते.आयुष्यातली  सलग पंचावन्न वर्षे हजारो रुग्णांना मदत केल्याचा कृतार्थ...

मरणारा 'पळपुटा' नसतो.

इमेज
       14 June , 2020 माणूस मेल्यावर दुःख होतं,हळहळतो आपण,मरणारा सेलिब्रेटी असेल तर मीडियात श्रद्धांजलीचा पूर येतो( तसा नुकताच हत्तीणीच्या मरणानेही तो आला होता)पण आपल्या अवतीभवती,आपल्या परिचयाचा  कोणीतरी  रोज थोडा थोडा मरत असतो हे  दिसत नाही आपल्याला.बेगडी असतो आपण,आणि  तेवढंच दांभिकही.       खरंतर दुःखात सुख मानणं वगैरे शुद्ध मूर्खपणा असतो आणि असं कोणाला मानायला सांगणं म्हणजे मूर्खपणाचा कळस ! (कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं) दुःख हे दुःखच असतं ते दुःखाच्या ओंजळीनेच पिता येतं.आत्महत्या हा 'पळपुटेपणा' हे म्हणायला सोप्पय हो, पण जी व्यक्ती त्या टोकाला जाते,जगणं नाकारुन मरणाला कवटाळते ते नक्कीच तिच्यासाठी सोपं नसतं/नसावं.ऐकणारं,ऐकून घेणारं कोणीतरी  आपलं माणूस जवळ असणं गरजेचं असतं अशावेळी.जे कोणत्याही  सल्ल्याशिवाय आपली सोबत करेल आधाराचा हात देईल ! पण दुर्दैवाने खचलेल्याला अजून खचायला भाग पाडणं,त्याच्या चुका उगाळून पुन्हा- पुन्हा सांगणं,काय करायला नको होतं हे ठासून त्याच्यावर बिंबवणं यामुळे समोरची व्यक्ती आयुष्याच्या अजून ए...

उजेड पेरणारी व्यक्ती!

इमेज
         काही व्यक्ती आयुष्याच्या एखाद्या वळणावर भेटतात पण काहींच्या भेटण्याने आयुष्यालाच वेगळे वळण लागते. भूतकाळातील अंधारवाटेवर  हातात कंदील घेऊन उभ्या असणाऱ्या अनेकांनी आपला प्रवास समृद्ध केलेला असतो,पण प्रवाशाच्या हातात प्रकाशाचे दान देऊन त्याच्या वाटा उजळून काढणाऱ्या काही मोजक्याच व्यक्ती आपल्याला लाभतात. प्राचार्या कुंदा हळबे अशीच एक व्यक्ती जिने माझ्यासारख्या कित्येकांच्या आयुष्यात उजेड पेरला. आज कोणत्याच अंधाराची भीती वाटत नाही कारण कुंदा हळबे ही व्यक्ती  प्रत्येक अवघड वळणावर कधी कंदील घेऊन उभी असते तर कधी  स्वतःच कंदील होऊन सोबत असते.        गोष्ट साधारणतः पंधरा वर्षांपूर्वीची आहे,माझी फारशी इच्छा नसताना D.Ed ला प्रवेश घेऊन महिनाच झाला असावा.हातात प्रवेश रद्द करण्यासाठीचा अर्ज घेऊन प्राचार्यांच्या केबिनमध्ये मी पाऊल टाकले आणि गोंधळलेल्या आवाजात हळबे मॅडमला म्हणालो,'मॅम,मला शिक्षक होऊन नोकरी करायची नाही, चार भिंतीच्या चौकटीत मी राहू शकत नाही त्यामुळे माझा प्रवेश रद्द करून दुसऱ्या कुणाला माझी सीट द्यावी' माझे हे आर्जव ऐक...